कोकण हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन प्रदेशांपैकी एक मानला जातो. निळाशार समुद्र, स्वच्छ बीचेस, ऐतिहासिक किल्ले, हिरवाईने नटलेले घाट आणि स्वादिष्ट कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे कोकणात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. जर तुम्ही ३ दिवसांची ट्रिप प्लॅन करत असाल, तर योग्य नियोजन करून कमी वेळात अनेक प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.
पहिला दिवस
पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पहाटे लवकर कोकणला जावे लागेल. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अलिबाग बीचवर जायचे आहे. अलिबाग बीच पुण्यामधून सुमारे १४९ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ९९.५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून अलिबाग जाण्यासाठी अंदाजे चार तास लागतात.
अलिबाग बीच
अलिबाग बीच रायगड जिल्ह्यामध्ये असून तो काळी वाळू, स्वछ समुद्र किनारा, नारळाची झाडे आणि शांत समुद्र किनारा इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अलिबाग बीच वरती कुलाबा हा ऐतिहासिक किल्ला असून तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. अलिबाग बीच वरती आपण अनेक विविध अॅक्टिविटी करू शकतो. अलिबाग बीच वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. अलिबाग बीच वरून अत्यंत सुंदर सूर्यास्त दिसतो. सूर्यास्ता मुळेच अलिबाग बीच फोटोग्राफी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
कुलाबा किल्ला
अलिबाग पासून कुलाबा किल्ला हा सुमारे २१० मीटर अंतरावर आहे. अलिबाग पासून कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी खाली मार्ग दिला आहे.
अलिबाग बीच → कुलाबा किल्ला
कुलाबा किल्ला हा रायगड जिल्ह्यामधील अलिबाग बीच वरती आहे. कुलाबा किल्ला हा रायगड पासून सुमारे १०९ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून कुलाबा किल्ला सुमारे १४१ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ९९.५ किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा कुलाबा किल्ला बांधला होता.
कुलाबा किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो समुद्राच्या मधोमध असूनही ओहोटीच्या वेळी पायी चालत गाठता येतो. भरतीच्या वेळी मात्र बोटीने जावे लागते.
किल्ल्यामध्ये मोठे प्रवेशद्वार, तटबंदी, पाण्याची टाकी आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. येथे गणेशाचे मंदिर आणि इतर काही ऐतिहासिक वास्तू आजही चांगल्या स्थितीत आहेत.
काशीद बीच
कुलाबा किल्ल्यापासून काशीद बीच हा सुमारे ३२.५ किलोमिटर अंतरावर आहे. कुलाबा किल्ल्यापासून काशीद बीच वर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
अलिबाग → चोल → रेवदंडा → कोरली → बारशिव → काशीद
काशीद बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो रायगड पासून सुमारे १०४ किलोमीटर अंतरावर आहे.
काशीद बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा. समुद्राच्या फेसाळ लाटा आणि किनाऱ्यावर वाहणारा थंड वारा मनाला खूप प्रसन्न वाटतो. समुद्रकिनाऱ्यालगत असलेली नारळ आणि सुरूची झाडे सुद्धा आहेत.
येथे पर्यटकांना जेट स्की,बनाना राइड , स्पीड बोट राइड यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. तसेच,बीच वॉक,फोटोग्राफी आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश अत्यंत सुंदर दिसतो.
काशीद बीचजवळ अनेकरेसॉर्टस होमस्ते आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथे कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांचाही स्वाद घेता येतो. ताजे सीफूड, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
काशीद बीच वरती दुपारचे जेवण
समुद्राच्या थंड वाऱ्यासोबत आणि निसर्गरम्य वातावरणात स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच असते. बीच परिसरात अनेक छोटे हॉटेल्स, होमस्टे आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेली रेस्टॉरंट्स पर्यटकांसाठी स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करतात.
येथे प्रामुख्याने फिश थाळी, कोम्बडी वडे, सोलकढी, कोळंबी फ्राय आणि ताजे सी-फूड खूप प्रसिद्ध आहे. शाकाहारी पर्यटकांसाठीही पिठलं-भाकरी, वरण-भात, पनीर भाजी आणि विविध महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध असतात. दुपारच्या वेळी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ बसून नारळाच्या झाडांच्या सावलीत जेवण केल्याने प्रवासाचा आनंद अधिक वाढतो.
काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर बसून घरून आणलेले खाद्यपदार्थही खातात आणि मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात.
काशीद बीच वर मुक्काम
काशीद बीच वर मुक्काम करणे हा शांत आणि आनंददायी अनुभव असतो. येथे बीच रेसॉर्टस, कॉटेज आणि होमस्टे अशा विविध राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्ट मध्ये राहिल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड वाऱ्याचा आनंद घेता येतो. अनेक ठिकाणी कोकणी आणि मालवणी जेवणाचीही सुविधा असते. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरणे आणि संध्याकाळी सुंदर सूर्यास्त पाहणे पर्यटकांना खूप आवडते. बजेट ते लक्ष्यरीचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे कुटुंब, मित्र किंवाकपल्स साठी काशीद बीच हा उत्तम मुक्कामाचा पर्याय मानला जातो.
पहिला दिवसाचा अंदाजे खर्च प्रती व्यक्ती (रुपयांमद्धे)
प्रवास
१,५०० – ३,०००
मुक्काम
२,००० – ५,०००
जेवण
५०० – १,५००
दूसरा दिवस
काशीद बीच वरुण दापोली बीच कडे प्रस्थान
काशीद बीच वरून दापोली कडे जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
काशीद बीच → नांदगाव → मुरुड → आंबेत → दापोली
काशीद बीच वर मुक्काम केल्यानंतर सकाळी दापोली कडे प्रस्थान करणे हा एक सुंदर प्रवास अनुभव असतो. सकाळच्या थंड वातावरणात आणि समुद्राच्या मंद वाऱ्यात प्रवास सुरू केल्यावर कोकणातील निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. काशीदहून दापोलीकडे जाताना घाटरस्ते, हिरवीगार झाडे, नारळाच्या बागा आणि समुद्रकिनारी भाग प्रवास अधिक सुंदर बनवतात.
रस्त्यात अनेक छोटे गाव, स्थानिक बाजार आणि कोकणी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. पावसाळा आणि हिवाळ्यात हा प्रवास अधिकच मनमोहक वाटतो. काही ठिकाणी थांबून चहा, नाश्ता आणि फोटोग्राफीचा आनंदही घेता येतो.
कर्डे बीच
दापोळी मधून कर्डे बीच वर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
दापोली → गीमहवने → मुरुड → कर्डे बीच
कर्डे बीच हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो रत्नागिरी पासून सुमारे १५७ किलोमीटर अंतरावर आहे. गर्दीपासून दूर असल्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी अनेक पर्यटक यकर्डे बीच वर येतात.
कर्डे बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील स्वच्छ किनारा आणि निळाशार समुद्र. सकाळच्या वेळी दिसणारा सूर्योदय आणि समुद्रावर पडणारी सूर्यकिरणे अत्यंत सुंदर दिसतात. समुद्रकिनाऱ्यावर चालणे, फोटोग्राफी करणे आणि शांतपणे बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे पर्यटकांना खूप आवडते.
येथे डॉल्फिन सफारी हा खास अनुभव मानला जातो. बोटीतून समुद्रात फेरफटका मारताना डॉल्फिन पाहण्याचा रोमांचक अनुभव मिळतो. तसेच, कर्डे बीचजवळ अनेक रेसॉर्टस, कॉटेज आणि होमस्टे सुद्धा उपलब्ध आहेत.
कोकणी खाद्यपदार्थ आणि ताजे सीफूड हे येथील आणखी एक आकर्षण आहे. सोलकढी, फिश फ्राय आणि मालवणी पदार्थ पर्यटक आवडीने खातात. शांत वातावरण, सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल, तर कर्डे बीच हे कोकणातील एक उत्तम पर्यटनस्थळ आहे.
लाडघर बीच
कर्डे बीच वरुन लाडघर बीच सुमारे ५.४ किलोमीटर अंतरावर आहे. कर्डे बीच वरून लाडघर बीच वर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
कर्डे बीच → कर्डे→ जामंत वाडी → लाडघर बीच
लाडघर बीच हा दापोली जवळील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा बीच आपल्या लालसर वाळू, स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील वाळूला हलका लालसर रंग दिसत असल्यामुळे या बीचला तामस तीर्थ असेही म्हटले जाते.
लाडघर बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरण. समुद्रकिनाऱ्यावर वाहणारा थंड वारा आणि फेसाळ लाटा पर्यटकांना खूप आकर्षित करतात. सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्ताचे दृश्य येथे अत्यंत सुंदर दिसते. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.
या बीचवर पर्यटकांना डॉल्फिन सफारी, वॉटर स्पोर्ट्स आणि बीच वॉक इत्यादी अॅक्टिविटी उपलब्ध आहेत. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. समुद्रकिनाऱ्याजवळ नारळ आणि सुरूची झाडे असल्यामुळे वातावरण अधिक रमणीय वाटते.
लाडघर बीच परिसरात अनेक रेसॉर्टस होम स्टे आणि कॉटेज उपलब्ध आहेत. येथे कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येतो. फिश फ्राय, सोलकढी, कोकम सरबत आणि ताजे सीफूड पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
अंजर्ले बीच
लाडघर बीच वरून अंजारले बीच हा सुमारे ३२.२ किलोमीटर अंतरावर आहे. लाडघर बीच वरून अंजारले बीच वर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
लाडघर बीच → दापोली → असुद → अंजर्ले बीच
लाडघर बीच → मुरुड → अंजर्ले बीच
अंजर्ले बीच हा दापोली जवळील एक अतिशय सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील हा बीच स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि नारळ-सुरूच्या झाडांनी वेढलेल्या निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर असल्यामुळे शांत वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात.
अंजर्ले बीच मुख्य आकर्षण म्हणजे येथील स्वच्छ आणि लांब समुद्रकिनारा. समुद्राच्या फेसाळ लाटा आणि किनाऱ्यावर वाहणारा थंड वारा मनाला खूप प्रसन्न वाटतो. सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्ताचे दृश्य येथे अत्यंत सुंदर दिसते. त्यामुळे फोटोग्राफी आणि रिलॅक्सेशनसाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
या बीचजवळ प्रसिद्धकाड्यावरचा गणपती मंदिर मंदिर आहे. डोंगरावर वसलेले हे मंदिर आणि तेथून दिसणारा समुद्राचा नजारा खूप आकर्षक वाटतो. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही कारणांसाठी पर्यटक येथे येतात.
अंजर्ले बीच परिसरात अनेक होम स्टे कॉटेज आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत. येथे कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांचाही आनंद घेता येतो. ताजे सीफूड, फिश फ्राय, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांना विशेष आवडते.
अंजर्ले बीच वरील स्थानिक पदार्थांचा आस्वाद
अंजर्ले बीच हा केवळ सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठीच नव्हे, तर स्वादिष्ट कोकणी खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील छोटे हॉटेल्स, आणि स्थानिक खानावळींमध्ये पारंपरिक कोकणी आणि मालवणी पदार्थांचा आस्वाद आपल्याला चाखायला मिळतो. येथे ताजे सीफूड हे मुख्य आकर्षण मानले जाते.
अंजर्ले बीच परिसरात फिश फ्राय, सुरमई करी, बांगडा फ्राय, कोळंबी मसाला आणि खेकडा करी हे पदार्थ पर्यटक आवडीने खातात. ताजे मासे स्थानिक मच्छीमारांकडून आणले जात असल्यामुळे पदार्थांची चव अधिक खास वाटते. नारळ आणि मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवलेले हे पदार्थ खूप स्वादिष्ट असतात.
जेवणासोबत दिली जाणारी सोलकढी हि कोकणातील प्रसिद्ध पेय आहे. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी शरीराला थंडावा देते आणि पचनासाठीही उपयुक्त मानली जाते. तसेच, कोकम सरबत आणि ताजे नारळपाणी यांचाही पर्यटक आनंद घेतात.
शाकाहारींसाठी कोकणी आमटी, नारळाच्या रसामध्ये बनवलेल्या भाज्या, घावणे आणि उकडीचे मोदक उपलब्ध असतात. उकडीचे मोदक हा पारंपरिक गोड पदार्थ पर्यटकांना विशेष आवडतो.
अंजर्ले बीच वर मुक्काम
अंजर्ले बीच वर मुक्काम करणे हा शांतता, निसर्ग आणि समुद्रसौंदर्य अनुभवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. दापोली जवळील हा समुद्रकिनारा गर्दीपासून दूर असल्यामुळे निवांत सुट्टीसाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे समुद्राच्या फेसाळ लाटा, थंड वारा आणि नारळाच्या झाडांनी वेढलेले वातावरण मनाला प्रसन्न करते.
अंजर्ले बीच परिसरात अनेक होम स्टे कॉटेज बीच रिसॉर्ट उपलब्ध आहेत. बजेट पासून आलिशान मुक्काम पर्यंत विविध पर्याय येथे पाहायला मिळतात. अनेक होमस्टे मध्ये स्थानिक कोकणी शैलीतील घरगुती वातावरण आणि स्वादिष्ट जेवणाचा अनुभव मिळतो.
येथील मुक्कामादरम्यान पर्यटकांना शांत वातावरणात विश्रांती करता येते. काही ठिकाणी डॉल्फिन सफारी, बीच वॉक आणि फोटोग्राफीचा आनंदही घेता येतो.
अंदाजे खर्च प्रती व्यक्ती (रुपायांमद्धे)
१,००० – २,५००
मुक्काम प्रवास
२,००० – ६,०००
जेवण
५०० – १,५००
तिसरा दिवस
गणपती पुळे बीच
अंजर्ले बीच पासून गणपती पुळे बीच हा सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आहे. अंजर्ले बीच पासून गणपतीपुळे बीच वर कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे.
अंजर्ले बीच → मुरुड → दापोली → गुहागर → हेदवी → रीळ → गणपती पुळे
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे बीच असून तो रत्नागिरी पासून सुमारे २५.८ किलोमीटर अंतरावर आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू आणि निळाशार समुद्र यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.
गणपतीपुळे बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले स्वयंभू गणपती मंदिर. अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात आणि त्याचबरोबर समुद्रसौंदर्याचाही आनंद घेतात. समुद्राच्या फेसाळ लाटा आणि किनाऱ्यावर वाहणारा थंड वारा मनाला शांतता देतो.
येथे पर्यटकांना जेट स्की, बनाना राइड , स्पीड बोट राइड यांसारख्या चा आनंद घेता येतो. तसेच, समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, सूर्यास्त पाहणे आणि फोटोग्राफी करणे यासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश अत्यंत सुंदर दिसतो.
गणपतीपुळे परिसरात अनेक रिसॉर्ट हॉटेल्स आणि होम स्टे उपलब्ध आहेत. येथे कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांचाही स्वाद घेता येतो. फिश फ्राय, सोलकढी, कोकम सरबत आणि ताजे सीफूड पर्यटकांना विशेष आवडते.
गणपती पुळे मधील गणेश मंदिर
गणपती मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन गणपती मंदिर आहे. हे मंदिर गणपतीपुले बीच जवळ समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले असल्यामुळे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे आणि हे मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने मानले जाते.
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती पश्चिम दिशेला समुद्राकडे तोंड करून आहे. त्यामुळे या मंदिराला पश्चिम द्वार देवता असेही म्हटले जाते. मंदिराभोवती डोंगर आणि समोर अथांग अरबी समुद्र असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते.
लोककथेनुसार, भगवान गणेशांनी भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी येथे वास्तव्य केले. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग असून अनेक भाविक डोंगराभोवती प्रदक्षिणा घालतात. गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिर परिसरात नारळाची झाडे, स्वच्छ समुद्रकिनारा आणि शांत वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करते. येथे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फिरणे,सूर्यास्त पाहणे आणि कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे पसंत करतात.
आरे वारे बीच
गणपती पुळे बीच पासून आरे वारे बीच हा सुमारे ११.५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपती पुळे पासून आरे वारे बीच वर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
गणपती पुळे बीच → आरे वारे बीच
आरे वारे बीच हा हा रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे.गणपती पुळे बीच जवळ असलेला हा बीच आपल्या स्वच्छ वातावरण, निळाशार समुद्र आणि हिरव्यागार डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. हा प्रत्यक्षात दोन किनाऱ्यांचा समूह असून त्यांना आरे आणि वारे असे म्हटले जाते.
या बीचचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्रकिनाऱ्या लगत असलेला वळणावळणाचा घाटरस्ता. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर असे अप्रतिम दृश्य येथे पाहायला मिळते. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
आरे वारे हे ठिकाण शांत वातावरणासाठी ओळखले जाते. गर्दी कमी असल्यामुळे येथे पर्यटक निवांत वेळ घालवण्यासाठी येतात. समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, फोटोग्राफी करणे आणि सूर्यास्त पाहणे यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश अत्यंत मोहक दिसतो.
येथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वॉटर स्पोर्ट्स नसल्यामुळे निसर्गाचा शांत अनुभव घेता येतो. परिसरात काही रिसॉर्ट आणि होम स्टे स्थानिक खानावळी उपलब्ध आहेत. कोकणी खाद्यपदार्थ, सोलकढी आणि ताजे सीफूड यांचाही येथे आनंद घेता येतो.
जयगड किल्ला
आरे वारे बीच पासून जयगड किल्ला हा सुमारे ३०.४ किलोमीटर अंतरावर आहे. आरे वारे बीच पासून जयगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग खाली दिला आहे.
आरे वारे बीच → मालगुड → जयगड किल्ला
जयगड किल्ला हा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि भव्य समुद्री किल्ला आहे. हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाजवळ उंच डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे पूर्वी समुद्रमार्गावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे.
जयगड किल्ल्याची बांधणी सुमारे १६व्या शतकात करण्यात आली होती. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मजबूत तटबंदी, मोठे प्रवेशद्वार आणि समुद्राकडे असलेले संरक्षणात्मक बांधकाम हे किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा अरबी समुद्र, शास्त्री नदी आणि परिसरातील हिरवाई अत्यंत सुंदर दिसते. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेले पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारे दृश्य खूप आकर्षक वाटते.
जयगड किल्ल्याच्या जवळील स्थानिक बाजार
जयगड किल्ल्याच्या परिसरातील स्थानिक बाजार हे कोकणी संस्कृती आणि पारंपरिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत. किल्ल्याजवळील गावांमध्ये छोटे बाजार आणि स्थानिक दुकाने पाहायला मिळतात, जिथे पर्यटकांना कोकणातील खास उत्पादने खरेदी करता येतात. येथे कोकम सरबत, काजू, आंबा उत्पादने, मालवणी मसाले, लोणची आणि नारळापासून बनवलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर मिळतात.
हापूस आंब्याच्या हंगामात या बाजारांमध्ये ताजे आंबे आणि आंब्यापासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच, स्थानिक महिलांनी तयार केलेली हस्तकला आणि पारंपरिक वस्तूही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. कोकणातील घरगुती मसाले आणि लोणची यांची चव पर्यटक आवडीने घेतात.
कोकण मधून परतीचा प्रवास
जयगड च्या किल्ल्याचा आजूबाजूच्या स्थानिक बाजारपेठातून वस्तू खरेदी केल्यानंतर परतीच प्रवास चालू होतो. पुणे किंवा मुंबईकडे परतीचा प्रवास हा सुंदर आठवणींनी भरलेला अनुभव असतो. समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि कोकणातील शांत वातावरण अनुभवून पर्यटक आनंदी मनाने परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. जयगड परिसरातून बाहेर पडताना अरबी समुद्राचे सुंदर दृश्य आणि हिरवाईने नटलेले डोंगर मन मोहून टाकतात.
पुण्याकडे जाताना सह्याद्री घाटांमधील वळणावळणाचे रस्ते आणि धुक्याने भरलेले निसर्गरम्य दृश्य प्रवास अधिक खास बनवतात. मुंबईकडे जाणाऱ्या
अंदाजे खर्च प्रती व्यक्ती (रुपयांमद्धे)
प्रवास
२,००० – ४,०००
दिवस
५०० – १,०००
संपूर्ण ट्रिपचा अंदाजे खर्च (रुपयांमद्धे)
बजेट ट्रिप
८,००० – १५,००० प्रति व्यक्ती
आरामदायी सहल
१५,००० – २५,०००
लक्झरी ट्रिप
३०,०००+
ट्रिपसाठी मूल्याच्या टिप्स
ऑक्टोबर ते मार्च सर्वोत्तम हा काळ
पावसात रेव्हॉट आणि अतिरिक्त ठेवा
बुकिंग करा
समुद्रात जास्त आत जाणे
स्थानिक खाद्यपदार्थांचा निश्चितच आस्वाद घ्या
